Skip to main content

Posts

Showing posts with the label Education

संवाद तरुणाईशी: रामन को मन की शक्ति देना

रात्रीचे साडे दहा वाजले असतील. अमेरिकन निवडणुकीचे निकाल बघायला टीव्ही समोर बसणार इतक्यात फोन वाजला. "हां बोल रे, रामन," मी नेहमीच्या उत्साहात सुरूवात केली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचकली. काहीतरी गडबड झाली आहे याचा अंदाज आला. रामन 24-25 वर्षांचा अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थी. ऐन कोरोनाच्या साथीत शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधायचे त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते पण यश येईना. "काय झालं?" मी काळजीने विचारलं. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला जड जात होतं. मला फक्त त्याचा हुंदका ऐकू आला.  "आय अॅम सॉरी," म्हणत रडू आवरायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं असह्य झालं होतं. तो मनमोकळेपणाने रडला. काही मिनिटं अशीच स्तब्ध गेली. हळूहळू तो बोलता झाला. गेले अनेक महीने घरी बसून असल्याने त्याचं दडपण रोज वाढत होतं. स्वतःच्या क्षमतांबद्दलचे प्रश्न मनात काहूर करत होते. त्यातच एका मैत्रिणीशी आज फोनवर बोलताना ती म्हणली, "अरे, इतर कितीतरी कमी deserving लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. तुला...

ज्ञा पु, ही चिटिंग आहे..

प्रिय ज्ञा पु, सप्रेम नमस्कार! आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत. मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं? तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ५: ब्रह्मपुत्रेचे प्रेमपत्र

आज मी थोडा मागे जाणार आहे. पर्ड्यू कि कोलंबिया या द्वंद्वाचा निकाल लागेना तेव्हा 'परत आल्यावर बघू' असे म्हणून मी अरुणाचलला निघून गेलो. निर्णय काहीही झाला तरी अमेरिकेला जाण्यापूर्वी अरुणाचलचा हा शेवटचा दौरा ठरणार अशी मनात धाकधूक होती. गेल्या ३ वर्षांत मी अरुणाचलचे ७ दौरे केले होते. तिथल्या मुलांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रम राबवत असताना त्या निसर्गभूमीशी खूप जवळचे नाते जडले होते. विशालकाय ब्रह्मपुत्र, रोइंगची नितळ देवपानी नदी, झिरोचे ते खुणावणारे डोंगर, मिचमिच्या डोळ्यांची लाजरीबुजरी पोरं, त्यांचं ते विशेष हिंदीतून बोलणं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणं आणि कधीच ते व्यक्त न करता येणं हे सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलं होतं. हे सगळं मागे सोडून यायचं या कल्पनेनीच मला कसंतरी होत होतं. गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून सोनलताई, मृण्मयी, स्वरूपाचा निरोप घेताना सगळं एकदम भरून आलं आणि तिथेच स्पष्ट झालं होतं की आपलं काही खरं नाही. अरुणाचलच्या सुदूर पूर्वेला रोइंग नावाचे शहर आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या विवेकानंद केंद्राच्या ७ शाळांचे विद्यार्थी तिथे वर्षातून ३ वेळा शिबिरां...

बाकरवडी ते बरीटो - भाग ४: दिल तो बच्चा है जी

आपल्याला कोलंबिया विद्यापीठाच्या टीचर्स कॉलेजमध्ये खरंच प्रवेश मिळाळा आहे याची पूर्ण खात्री झाल्यावर आणि त्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीला मी माझ्या PhD चे मार्गदर्शक प्रा. बोर्लंड यांना पत्र लिहिलं. प्रज्ञावंतांच्या शिक्षणातील ते एक अतिशय विद्वान आणि जगप्रसिद्ध प्राध्यापक आहेत. गेल्या काही महिन्यांत आमच्यात जो पत्रव्यवहार झाला होता त्यातील त्यांच्या सूचनेवरूनच मी इकडे अर्ज पाठवण्याचं धाडस केलं होतं. "आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आता शिष्यवृत्तीच्या पत्राची प्रतीक्षा आहे.", मी त्यांना कळवले. PhD च्या शिक्षणासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती मिळतेच या विश्वासाने मी पुढच्या नियोजनाला लागलो. आठवडाभरात विद्यापीठाचा निर्णय येईल याची खात्री होती म्हणून १५ मार्च उजाडला तरी अजून काहीच निर्णय न आल्याने मी थोडा अस्वस्थ व्हायला लागलो होतो. पुढच्या नियोजनाच्या अंतर्गत विनयने, खूप वर्षं बारगळलेल्या आमच्या एका रोडट्रीपची आठवण करून दिली आणि आम्ही, म्हणजे मी, बंड्या आणि विनयने 'आता कमी दिवस उरलेत बाबा' या अविर्भावा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ३: 120th Street, New York

नोव्हेंबर महिन्यातली अर्जांची धावपळ एक डिसेंबरच्या रात्री थंडावली. Harvard, Berkeley, Stanford, Michigan, Wisconsin, आणि Vanderbilt अशा शिक्षण विषयातल्या सहा जगप्रसिद्ध आणि पहिल्या २० च्या यादीतल्या विद्यापीठांचे अर्ज भरून पाठवताना भरपूर दमछाक झाली. शेवटचे २-३ दिवस कामावरून सुट्टी घ्यावी लागलीच. अजून तीन ठिकाणचे अर्ज बाकी होते. त्यांच्या अंतिम तारखा १५ डिसेम्बर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारी असल्याने मी पुन्हा निवांत झालो. शेवटच्या दिवशीपेक्षा अलीकडेच काम संपवले तर आपल्याकडून फाउल होईल आणि धारिणीला धूळ खात पडलेली अभियांत्रिकीची पदवी झोपेत येऊन आपल्याला शाप देईल या भीतीने ते तीनही अर्ज मी शेवटच्याच दिवशी भरले. उगीच रिस्क कशाला?! मी एकूण ९ अर्ज पाठवले. (म्हणजे लाखभर रुपयांचा चुराडा... जास्तच...असो) पैकी ७ ठिकाणी गणित शिक्षण या विषयात तर बाकी दोन ठिकाणी प्रज्ञावंतांचे शिक्षण या विषयात अर्ज केले. अजूनही PhD साठी शिकायला परदेशात जाण्याची मानसिक तयारी झालेलीच नव्हती. पुण्यात माझं निवांत चालू होतं. घरी राहायचं, हातात जेवणाचे आयते ५-६ डबे, कार्यालय मोजून ७ मिनिटांच्या अंतरावर, सगळे सहकारी वर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १: माझे जीआरीपुराण

गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला बाप्पाचं विसर्जन झालं. अंगात जितकी ताकद होती तितकी सगळी लावून रात्रीची मिरवणूक वाजवली. बहुतेक हीच आपली पुण्यातली शेवटची मिरवणूक ठरणार अशी शंका मनात होती. त्यामुळे सुरुवातीलाच कमरेला बांधलेला ताशा शेवटपर्यंत काही मी सोडला नाही. वाद्यांची आवराआवर संपवून घरी येऊन झोपलो ते थेट दुसऱ्या रात्री जेवायलाच उठलो. PhD ला कुठेतरी भारताबाहेर प्रवेश घेण्याचा विचार त्याआधी वर्षभर मनात रेंगाळत होता पण त्यासाठी लागणारी तयारी करायला मुहूर्त लागत नव्हता. बाप्पाचं विसर्जन झालं की तयारी सुरु करायची असं काहीसं ठरवलेलं. तर, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री GRE च्या परीक्षेची माहिती वाचायला घेतली. ETS ची वेबसाईट, काही ब्लॉग्स वगैरे वाचून काढले. काय काय तयारी करायला लागते हे नोंदवायला घेतलं. दुसऱ्या बाजूला हार्वर्ड, कोलंबिया वगैरे विद्यापीठांच्या संकेतस्थळांवर जाऊन माहिती वाचायला घेतली. उगाचच मोठालं अवाढव्य स्वप्नरंजन सुरु झालं.  आणि काही क्षणांमध्येच भानावर आलो - GRE ची तारीख! २ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशला जायचं नियोजन आधीच ठरलेलं आणि ते रद्द करण्याचा व्याभिचारी विचार मनाला शिवणं शक्यच...

आठवण..

एखाद्या कल्पनेने आपण भारावून जातो. त्याबद्दलचे मनोरे रचायला लागतो. कधीतरी अचानक ठरवून टाकतो त्या कल्पनेला मूर्त रूप द्यायचे. आणि मग लगबग सुरु होते. सोहळा उभा राहतो आणि सोहळा संपन्न होतो. धावपळ शमते तशी मागे वळून पाहताना मन रेंगाळते समाधानाच्या क्षणांपाशी. दमलेले शरीर बोलू लागते स्वतःशीच. आणि विश्रांतीचा विचार मनात येताच आठवण होते संकल्पाची...आठवण.. आठवण थकलेले डोळे दोन झोपताना म्हणती .. सुट्टी घेऊ उद्या आता स्वप्नांमध्ये फिरती /१/ दमलेले पाय दोन गादीवरी पडती.. प्रवासाला पुढच्या न्या नवे कुणी सोबती /२/ वाकलेली पाठ एक घेऊ म्हणे विश्रांती.. दम घेते थोडा आता जाऊ उद्या संगती /३/ गुंगलेले मन माझे समाधानी रमती.. देऊनिया साक्ष त्याची आनंदक्षण गणती /४/ लगबग मती मग आठवण करती.. उठूनिया उद्या पुन्हा लावायची पणती /५/ बब्बू संवर्धन प्रज्ञेचे 18.2.2017

'किमयागार' अर्णव, आईनस्टाईन आणि पृथ्वीचे वय!

१०व्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे परमबंधू अर्णवशेट जायस्वाल आणि त्यांच्या कुतूहलास सप्रेम भेट... १६ डिसेंबर म्हणजे आमच्या मातोश्रींचा जन्मदिवस. बांग्लादेशची निर्मितीदेखील याच दिवशीची. काय योगायोग म्हणावा!  असो! नेहमीप्रमाणे मी प्रबोधिनीतून उशिराच घराकडे निघालो. काय सुबुद्धी सुचली आणि कधी नव्हे ते मी आधी फोन केला. आई आज्जीकडे होती. गाडीला टांग मारली आणि आम्हीही थेट पोहोचलो आमच्या मामाच्या किल्ल्यावर. तिथे आमच्या 'माईसाहेबांचे', म्हणजे आमच्या आज्जीचे राज्य चालते. गेलो ते थेट जेवणाच्या ताटावर बसलो तेव्हाच लक्षात आले कि शेवटच्या पंक्तीला फक्त आज्जी साथ द्यायला थांबलीये म्हणजे आपल्या पोटातली जागा आता ओढून ताणून का होईना मोठी करायला लागणार! त्यावर एक विस्तृत विवेचन लिहिता येईल. असो! जसा ताटावर बसलो तसा कुठून तरी आमचा अर्णव तिथे उपटला आणि मला बघताच टूणकन माझ्या मांडीवर येऊन बसला. अर्णव म्हणजे आमच्या धाकट्या मामासाहेब पेशव्यांचा थोरला बाजीराव. वय वर्षे १०! यत्ता ५वी'. पण डोळ्यावर 'अतीव अभ्यासूपणाचा' साक्षी पुरावा देणारा, एकसारखा नाकावरून खाली घसरणारा चष्मा आणि पेशव्यांना...

प्रज्ञेच्या जोपासनेसाठी हवे कोंदण!

ज्ञान प्रबोधिनीतर्फे सुरु करण्यात आलेल्या 'प्रज्ञावंतांचे शिक्षण: पद्धती आणि धोरणे' या नाविन्यपूर्ण पी.जी. डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निमित्ताने लिहिलेला लेख दैनिक सकाळने ५ ऑगस्ट २०१५ च्या संपादकीय पानावर छापला. भारतातील या विषयावरचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. त्या निमित्ताने.. स र्व मुलांना समान शिक्षण देण्याच्या प्रयत्नात शाळांमधल्या तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षणक्रमात ,  शिक्षण-पद्धतींमध्ये आणि शैक्षणिक धोरणात मागे पडला आहे. असामान्य बुद्धिमत्तेची मुले सर्वच समाजगटांमध्ये आढळून येतात. अगदी शाळांमध्ये आणि चहाच्या टपरीमध्ये सुद्धा. गावात आणि शहरात आणि अगदी आदिवासी पाड्यावर सुद्धा. अश्या मुलांमध्ये असामान्य स्मरणशक्ती, अद्भुत कल्पकता, अफलातून विनोदबुद्धी, उत्तम तार्किक शक्ती नजरेस येते. ‘काहीतरी वेगळीच चुणूक आहे’ असं आपण नकळत म्हणून जातो. परंतु अश्या वेगळ्या क्षमतांच्या मुलांचा विचार आपण शिक्षणव्यवस्थेत करतो आहोत का याबद्दल हा लेखनप्रपंच.   ‘प्रज्ञावंतांचे शिक्षण’ हा विषय आपल्या भारत देशात खूपच कमी प्रमाणात अभ्यासला गेला आहे. या विषयाबद्दल अन...

त्याच्या डोळ्यांतले प्रश्‍न...

परिस्थितीनं पोळलेली आणि शिक्षणापासून दूर राहिलेली ती मुलं होती. शिकण्यासाठी त्यांच्यामनात ऊर्मी दाटत होती; पण मार्गदर्शन आणि धीराचे चार शब्द हवे होते त्यांना भरारी घेण्यासाठी. .. सा धारण रात्री नऊची वेळ. शिवाजी मराठा शाळेसमोरच्या रस्त्यावर मी आणि आमच्या दलातील मुलं स्केटिंगचा सराव करत होतो. डिसेंबर महिन्यातील नुकतीच वाढू लागलेली थंडी आणि जानेवारीतल्या क्रीडा प्रात्यक्षिकातल्या सादरीकरणाची लगबग. अशातच एक मोठ्या डोळ्यांचा, थोडं पोट सुटलेला एका हाताने अर्धवट अपंग, डोळ्यात सुरमा लावलेला मुलगा लांबूनच आमच्याकडे टक लावून बघत होता. न राहवून थोड्या वेळांनी मीच त्याला विचारलं, "काय रे नाव काय तुझं?" "साबीर" त्याचं उत्तर आलं. त्याच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमागची अस्वस्थ नजर ओळखून मी त्याला विचारले, "स्केटिंग शिकशील?" आणि तोही तितक्‍याच सहजपणे म्हणाला, "हॉं, हॉं, मुझे भी सिखाओगे?" आणि त्यानंतर तो आमच्यात सहजच आला. पुढे तो रोज येत राहिला आणि आमची ओळख वाढत गेली. साबीर शेजारच्याच बंगल्यात घरगडी म्हणून काम करतो. 17-18 वर्षे वय. चार वर्षांपूर्वी अभ्यास डोक्‍...

आज मेरे घर चलेंगे सर!

“आ ज मेरे घर चलेंगे सर!”, थानेंद्र ने घोषित कर दिया. “नहीं सर. आज मेरे घर.”, नीलकंठ बोला. “नहीं सर. मैने पहले बोला था”, थानेंद्र गुस्सेसे बोला. “हां. उसने पहले बोला था. आज मै थानेंद्र के घर जाऊंगा”, थानेंद्र का लाल चेहरा देख मैने तुरंत निर्णय बता दिया. पिछले दो दिन से शाला के बाद किसी न किसी के घर जाने का न्योता मिल रहा था. कल किशन के घर गया था. उसके झोपड़े में बड़ी प्यार से बैठाकर उसने उसके माँ के हात के बने हुए मुरमुरे और बिना दूध की चाय पिलायी. उसके बापू मजदूरी करते है और माँ बाजार में मुरमुरे बेचती है. माँ ने बोला, “मेरा बच्चा पढने में कमजोर हे. लेकिन घर के काम में पूरा एक नंबर. खाना भी बना लेता है.” आज थानेंद्र के घर ऐसेही कुछ देखने-सुनने को मिलेगा यही सोचकर मोटर-सायकिल शुरू किया. थानेंद्र और नीलकंठ भी गाडी पर कूदे. दोनों ही बड़े उस्ताहित थे. किशन, नीलकंठ, थानेंद्र यह सब मेरे पांचवी कक्षा के बच्चे है. छत्तीसगढ़ के कबीरधाम जिले में राजानवागाँव नाम के एक छोटेसे गाव में सरकारी शाला में पढ़ते है. मै उन्हें पिछले दो हफ्तों से गणित पढ़ा रहा हूँ. कीचड़ भरे रस्ते से छोटी छोट...