Skip to main content

Posts

Showing posts with the label Helplessness

संवाद तरुणाईशी: रामन को मन की शक्ति देना

रात्रीचे साडे दहा वाजले असतील. अमेरिकन निवडणुकीचे निकाल बघायला टीव्ही समोर बसणार इतक्यात फोन वाजला. "हां बोल रे, रामन," मी नेहमीच्या उत्साहात सुरूवात केली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचकली. काहीतरी गडबड झाली आहे याचा अंदाज आला. रामन 24-25 वर्षांचा अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थी. ऐन कोरोनाच्या साथीत शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधायचे त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते पण यश येईना. "काय झालं?" मी काळजीने विचारलं. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला जड जात होतं. मला फक्त त्याचा हुंदका ऐकू आला.  "आय अॅम सॉरी," म्हणत रडू आवरायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं असह्य झालं होतं. तो मनमोकळेपणाने रडला. काही मिनिटं अशीच स्तब्ध गेली. हळूहळू तो बोलता झाला. गेले अनेक महीने घरी बसून असल्याने त्याचं दडपण रोज वाढत होतं. स्वतःच्या क्षमतांबद्दलचे प्रश्न मनात काहूर करत होते. त्यातच एका मैत्रिणीशी आज फोनवर बोलताना ती म्हणली, "अरे, इतर कितीतरी कमी deserving लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. तुला...

ज्ञा पु, ही चिटिंग आहे..

प्रिय ज्ञा पु, सप्रेम नमस्कार! आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत. मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं? तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग ८: भागलपूरचा भामटा

आमचं गंगास्वप्न पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बंगालमधून पुण्याकडे परतणारे गट कायम रात्री १० वाजताची आझाद हिंद एक्स्प्रेस पकडून रायपूर-नागपूरमार्गे पुण्याला पोचतात. परंतु आम्हाला काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची खुमखुमी असल्याने (अंगातले कीडेच म्हणू शकता) आम्ही फरक्काला गाडी पकडून बिहार, उत्तर प्रदेश मार्गे मुंबई गाठायची असं ठरवलं होतं. जेवण उरकून रेल्वे स्थानकाकडे निघणार तेव्हाच गाडी १२ तास उशिरा येणार असल्याचं समजलं. म्हणजे आता संपूर्ण रात्र त्या निर्मनुष्य स्थानकावर काढायची किंवा मालदाकडे उलट जाऊन तिथे वाट पहात बसायचं असे दोन पर्याय समोर होते. रात्री बाराच्या आसपास आम्ही पुढच्या गाडीत जनरलच्या डब्यात चढलो आणि मालदा स्थानक गाठलं. प्रतीक्षाकक्षात वेळ काढत रात्र कशीबशी पुढे सरकली. दर काही तासांनी गाडीची चौकशी करून यायचं, 'कुछ पता नही' हेच उत्तर पुन्हा ऐकायचं, आणि कधीही आपली गाडी येईल आणि आपल्याला न घेताच निघून जाईल अशा अनावश्यक भीतीने अस्वस्थ व्हायचं हे चक्र चालूच होतं. मरणप्राय कंटाळा! अखेर दुपारी कधीतरी गाडी आली आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वाट बघून दमलेल...