Skip to main content

Posts

Showing posts with the label Human Nature

बाकरवडी ते बरीटो - भाग ९: निरोप

बंगाल दौऱ्याहून परतल्यावर मी प्रबोधिनीतील कामाचा तांत्रिक राजीनामा दिला. गेल्या वर्षभरातल्या घडामोडी झरझर डोळ्यासमोरून जात होत्या. गणपती बाप्पाचं विसर्जन, त्यानंतर जेमतेम वीस दिवसांत केलेली GRE च्या परीक्षेची तयारी, धावपळ करत गाठलेल्या अर्जांच्या डेडलाईन्स, कोलंबिया विद्यापीठाचा थरार, पर्ड्यू की कोलंबिया हे ठरवण्यात झालेली मानसिक ओढाताण, अरुणाचल प्रदेशचा एक भावपूर्ण दौरा, दलासोबत केलेला मणिपूर-बंगालचा प्रवास, ब्रह्मपुत्रेचं प्रेमपत्र, आणि गंगेचा अवघड निरोप! निरोप, किती अवघड गोष्ट! आपल्या हृद्य लोकांचा, इथल्या गुंफलेल्या नात्यांचा, या गंधभरल्या जमिनीचा, चविष्ट जेवणाचा एकाएकी निरोप.. पलीकडे काहीतरी मोठं खुणावत असताना हातातला रंगलेला डाव मोडून त्या अनागताच्या मागे जाण्यासाठी एकदा मागे वळून बघणं आणि पुन्हा तोच जुना डाव तसाच आधीसारखा रंगवायला मिळेल का नाही याची हूरहूर अनुभवणं हा मोठा अवघड प्रकार आहे. खुणावणाऱ्या पैलतीरासाठी ऐलतीर सोडण्याची भीती आणि पलीकडच्या गावी वाढून ठेवलेल्या अदृश्य शंकांचं एक भलंमोठं काहूर! तेवीस जुलैला व्हिसाच्या मुलाखतीचे सोपस्कार पार पडले आणि मन घट्ट करून १४ ऑगस...

बाकरवडी ते बरीटो - भाग ८: भागलपूरचा भामटा

आमचं गंगास्वप्न पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बंगालमधून पुण्याकडे परतणारे गट कायम रात्री १० वाजताची आझाद हिंद एक्स्प्रेस पकडून रायपूर-नागपूरमार्गे पुण्याला पोचतात. परंतु आम्हाला काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची खुमखुमी असल्याने (अंगातले कीडेच म्हणू शकता) आम्ही फरक्काला गाडी पकडून बिहार, उत्तर प्रदेश मार्गे मुंबई गाठायची असं ठरवलं होतं. जेवण उरकून रेल्वे स्थानकाकडे निघणार तेव्हाच गाडी १२ तास उशिरा येणार असल्याचं समजलं. म्हणजे आता संपूर्ण रात्र त्या निर्मनुष्य स्थानकावर काढायची किंवा मालदाकडे उलट जाऊन तिथे वाट पहात बसायचं असे दोन पर्याय समोर होते. रात्री बाराच्या आसपास आम्ही पुढच्या गाडीत जनरलच्या डब्यात चढलो आणि मालदा स्थानक गाठलं. प्रतीक्षाकक्षात वेळ काढत रात्र कशीबशी पुढे सरकली. दर काही तासांनी गाडीची चौकशी करून यायचं, 'कुछ पता नही' हेच उत्तर पुन्हा ऐकायचं, आणि कधीही आपली गाडी येईल आणि आपल्याला न घेताच निघून जाईल अशा अनावश्यक भीतीने अस्वस्थ व्हायचं हे चक्र चालूच होतं. मरणप्राय कंटाळा! अखेर दुपारी कधीतरी गाडी आली आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वाट बघून दमलेल...

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ५: ब्रह्मपुत्रेचे प्रेमपत्र

आज मी थोडा मागे जाणार आहे. पर्ड्यू कि कोलंबिया या द्वंद्वाचा निकाल लागेना तेव्हा 'परत आल्यावर बघू' असे म्हणून मी अरुणाचलला निघून गेलो. निर्णय काहीही झाला तरी अमेरिकेला जाण्यापूर्वी अरुणाचलचा हा शेवटचा दौरा ठरणार अशी मनात धाकधूक होती. गेल्या ३ वर्षांत मी अरुणाचलचे ७ दौरे केले होते. तिथल्या मुलांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रम राबवत असताना त्या निसर्गभूमीशी खूप जवळचे नाते जडले होते. विशालकाय ब्रह्मपुत्र, रोइंगची नितळ देवपानी नदी, झिरोचे ते खुणावणारे डोंगर, मिचमिच्या डोळ्यांची लाजरीबुजरी पोरं, त्यांचं ते विशेष हिंदीतून बोलणं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणं आणि कधीच ते व्यक्त न करता येणं हे सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलं होतं. हे सगळं मागे सोडून यायचं या कल्पनेनीच मला कसंतरी होत होतं. गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून सोनलताई, मृण्मयी, स्वरूपाचा निरोप घेताना सगळं एकदम भरून आलं आणि तिथेच स्पष्ट झालं होतं की आपलं काही खरं नाही. अरुणाचलच्या सुदूर पूर्वेला रोइंग नावाचे शहर आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या विवेकानंद केंद्राच्या ७ शाळांचे विद्यार्थी तिथे वर्षातून ३ वेळा शिबिरां...

डोंगर असाही डोंगर तसाही

छायाचित्र सौजन्य : अनुप इताले डोंगर.. उंच डोंगर ढगाळ डोंगर पाणीदार डोंगर हिरवागार डोंगर.. धुकट डोंगर गारगार डोंगर शांत डोंगर सात्विक डोंगर.. आदिवासी डोंगर भाबडा डोंगर प्रेमळ डोंगर निखळ डोंगर.. तोच डोंगर.. कठोर डोंगर रौद्र डोंगर भयाण डोंगर.. दुर्लक्षित डोंगर उपेक्षित डोंगर अविकसित डोंगर नकोसा डोंगर.. दुष्ट डोंगर क्रूर डोंगर निर्दयी डोंगर नको रे डोंगर..  बब्बू 7 जून 18 नागालँड-मणिपूर अभ्यास दौरा

ICU (आय. सी. यु)

(आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगणाऱ्या अनुभवामधून जन्मलेली कविता…) छताकडे डोळे लावून आतमध्ये थरथरत होता 'तो'... टिकटिक संपण्याची वाट बघत घंटेकडे डोळे लावून मंदिराबाहेर थिजली होती 'ती'... कौल येण्याची वाट बघत घड्याळाकडे डोळे लावून दरवाज्याबाहेर बसला होता 'चित्रगुप्त'... ड्युटी संपण्याची वाट बघत बसून राहिली तशीच रेंगाळत न सरकता 'वेळ'... पाट फुटण्याची वाट बघत मारत राहिले लाथा अथक चिवट खेळात 'चौघेही' 'दुसरे' थकण्याची वाट बघत!  बब्बू

प्रतीक

गेल्या काही महिन्यांपासून आजूबाजूच्या घटना आणि सामान्य समाजाचे वर्तन पाहून मनात येणाऱ्या अस्फुट विचारांना आज कवितेची वाट मिळाली..माझी बहुतेक पहिलीच कविता! प्रतीक काही बोलायचे आहे पण बोलणार नाही समशेर उपसली होती पण मारणार नाही आसवे डोळ्यामधली मी गाळणार नाही मित्राच्या खांद्यावरती मस्तक टेकणार नाही मी नाही विकल, नाही मी अस्वस्थ निष्क्रिय मी केवळ, गर्दीचे प्रतीक फुकाची ती वाफ, तरल तो आक्रोश विरून ही जातो, झुंडीत मी पोटाच्या दाण्यांसाठी, दृष्टी आड सृष्टी सत्य नेमके काय, याचा ठाव नाही वेडा की रे तो, जो नाचतो बेभान विसावणार तो ही, चार निमिशांत मग कशा हवी फुकाची, ती धावपळ निष्क्रियता माझी, स्वप्निल थोर आहे! बब्बू पुणे 12 मार्च 16

कुणी घर देईल का घर?

वेळ रात्री 1 ची. 'नटसम्राट' बघून सुन्न डोक्याने 'मंगला' मधून बाहेर पडलो. चांगलीच थंडी होती. 'To be or not to be' म्हणत स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न विचारणारा नटसम्राट, स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेल्या माजावर काळाने केलेली मात पाहून उध्वस्त झालेला नटसम्राट, प्रचंड प्रेम केलेल्या पोटच्या पोरांकडून अपमानित झालेला रंगभूमीचा दुभंगलेला नटसम्राट! कधी मुजोर, कधी हळवा, कधी निखळ, कधी लाचार भासणाऱ्या नटसम्राटाने डोक्यात वादळ उभं केलं होतं. त्याच अवस्थेत बाईक सुरु केली आणि बाहेर पडलो. महापालिकेसमोरच्या मुख्य रस्त्याला लागेपर्यंत थंडीने शरीराचा ताबा घेतला होता. नटसम्राटाची शोकांतिका मात्र मनातून काही दूर होईना. पण जमेल तितकया वेगात घर गाठून रजईत गुरफटून घेऊन झोपण्याचा विचार मनाला सुखावत होता. इतक्यात रस्त्याच्या कडेला तिरप्या झापेखाली चिकटून झोपलेली कुटुंबं दिसली. नदीच्या कडेला, गार वाऱ्याशी त्यांचं भांडण चालुये असा भास झाला. मग्रूर प्राक्तनाला दोष देण्याऐवजी जगण्याच्या चिवट बेदरकार इच्छेने थंडीशी त्यांचं जणू युद्ध चालू होतं. कुणी घर देईल का घर? - नटसम्राट...