Skip to main content

Posts

Showing posts with the label PhD

बाकरवडी ते बरीटो - भाग १०: बरीटोशी गट्टी

ठाण्याच्या अलीकडे गाड्यांची ही प्रचंड गर्दी. विमानतळावर जाण्यापूर्वी ठाण्याच्या मामाला भेटायचं आणि मग रवाना व्हायचं, असं ठरलं होतं. पण ही गर्दी बघता विमान चुकतंय का काय अशी भीती वाटायला लागली होती. त्यातच शेजारच्या धसमुसळ्या चालकाने आमची गाडी घासली आणि आरश्याचा चुराडा झाला. गाडीतला ताण हळूहळू वाढत चालला होता...अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती...त्यातही वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचे प्रयत्न आईकडून चालूच होते! ठाण्याला पोचलो तेव्हा घराच्या बाहेरच पवईचा अनुप भेटला. अनेक तास वाट बघून कंटाळला होता बिचारा. खरगपूरहून रत्नदीप येऊ शकणार नव्हता. अनुप, रत्नदीप, सौरभ, पुष्कर म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षातले सर्वात जवळचे साथीदार. त्यांनी मिळून एक भेटवस्तू आणली होती. ती देण्यासाठी रात्रीच्या अपप्रहारी अनुप ठाण्याच्या अनोळखी गल्लीत वाट बघत उभा होता. मामाचा निरोप घेऊन विमानतळावर पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा तो रुबाबच अजब! अनेक मित्रांनी माझ्याआधी यापूर्वी तिथून जड निरोप घेतला होता. त्या सर्वांच्या मनात भावनांची काय गर्दी त्या क्षणी झाली असेल याचा अनुभव मी घेत होतो. भव्य कमानींच्या प्रवे...

बाकरवडी ते बरीटो - भाग ९: निरोप

बंगाल दौऱ्याहून परतल्यावर मी प्रबोधिनीतील कामाचा तांत्रिक राजीनामा दिला. गेल्या वर्षभरातल्या घडामोडी झरझर डोळ्यासमोरून जात होत्या. गणपती बाप्पाचं विसर्जन, त्यानंतर जेमतेम वीस दिवसांत केलेली GRE च्या परीक्षेची तयारी, धावपळ करत गाठलेल्या अर्जांच्या डेडलाईन्स, कोलंबिया विद्यापीठाचा थरार, पर्ड्यू की कोलंबिया हे ठरवण्यात झालेली मानसिक ओढाताण, अरुणाचल प्रदेशचा एक भावपूर्ण दौरा, दलासोबत केलेला मणिपूर-बंगालचा प्रवास, ब्रह्मपुत्रेचं प्रेमपत्र, आणि गंगेचा अवघड निरोप! निरोप, किती अवघड गोष्ट! आपल्या हृद्य लोकांचा, इथल्या गुंफलेल्या नात्यांचा, या गंधभरल्या जमिनीचा, चविष्ट जेवणाचा एकाएकी निरोप.. पलीकडे काहीतरी मोठं खुणावत असताना हातातला रंगलेला डाव मोडून त्या अनागताच्या मागे जाण्यासाठी एकदा मागे वळून बघणं आणि पुन्हा तोच जुना डाव तसाच आधीसारखा रंगवायला मिळेल का नाही याची हूरहूर अनुभवणं हा मोठा अवघड प्रकार आहे. खुणावणाऱ्या पैलतीरासाठी ऐलतीर सोडण्याची भीती आणि पलीकडच्या गावी वाढून ठेवलेल्या अदृश्य शंकांचं एक भलंमोठं काहूर! तेवीस जुलैला व्हिसाच्या मुलाखतीचे सोपस्कार पार पडले आणि मन घट्ट करून १४ ऑगस...

बाकरवडी ते बरीटो - भाग ७: जैसे बरसों में कोई गंगा नहाए

६ जून २०१८. मणिपूरच्या डोंगरांमधून बाहेर पडलो तेव्हा ४ दिवसांनी मोबाईलला रेंज मिळाली. गटाचा निरोप घेऊन एकट्यानेच परतीचा प्रवास सुरु केला. पुढचा मुक्काम नागालँडच्या दिमापूरला होता. इथल्या छात्रावासात १३ वर्षांपूर्वी राहिल्याच्या उत्कट आठवणी सोबत होत्या. तेव्हा दिमापूरमध्ये पावसाने चांगलाच झोडपून काढला होता आम्हाला. रेल्वे स्थानकावर स्थानिक गुंडांनी दिलेली दहशत अजूनही मनात ताजी होती. दिमापूर म्हणजे घटोत्कचाचे शहर. इथल्या राजबाडीतील दगडी प्यादे म्हणजे घटोत्कच आणि भीमाचा बुद्धिबळाचा पट होता म्हणे! त्या दिमापूरात मला आज एक महत्वाचं काम उरकायचं होतं - व्हिसाचा अर्ज. हो, एकीकडे निवांत भारतभ्रमण चालू असताना मी अजूनही व्हिसाचा अर्ज केला नव्हता. अमेरिकेची स्वप्नं काही अजूनही पडत नव्हती आणि व्हिसा म्हणजे तर शेवटचा प्रहार होता. तिथून माघार नव्हती. मग आज करू, उद्या करू, म्हणून टाळंटाळ चालली होती. पण आता अर्ज केला नाही तर तारीख मिळूनही वेळेत व्हिसा हातात येणार नाही हे लक्षात आल्यावर हे काम दिमापूरमध्ये पूर्ण करायचं असं  ठरवूनच मणिपूर सोडलं होतं. गावभर फिरून शबनमचं मोठं खोकं खरे...

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ५: ब्रह्मपुत्रेचे प्रेमपत्र

आज मी थोडा मागे जाणार आहे. पर्ड्यू कि कोलंबिया या द्वंद्वाचा निकाल लागेना तेव्हा 'परत आल्यावर बघू' असे म्हणून मी अरुणाचलला निघून गेलो. निर्णय काहीही झाला तरी अमेरिकेला जाण्यापूर्वी अरुणाचलचा हा शेवटचा दौरा ठरणार अशी मनात धाकधूक होती. गेल्या ३ वर्षांत मी अरुणाचलचे ७ दौरे केले होते. तिथल्या मुलांसाठी प्रज्ञा विकास कार्यक्रम राबवत असताना त्या निसर्गभूमीशी खूप जवळचे नाते जडले होते. विशालकाय ब्रह्मपुत्र, रोइंगची नितळ देवपानी नदी, झिरोचे ते खुणावणारे डोंगर, मिचमिच्या डोळ्यांची लाजरीबुजरी पोरं, त्यांचं ते विशेष हिंदीतून बोलणं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणं आणि कधीच ते व्यक्त न करता येणं हे सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलं होतं. हे सगळं मागे सोडून यायचं या कल्पनेनीच मला कसंतरी होत होतं. गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून सोनलताई, मृण्मयी, स्वरूपाचा निरोप घेताना सगळं एकदम भरून आलं आणि तिथेच स्पष्ट झालं होतं की आपलं काही खरं नाही. अरुणाचलच्या सुदूर पूर्वेला रोइंग नावाचे शहर आहे. भारताच्या सीमावर्ती भागातल्या विवेकानंद केंद्राच्या ७ शाळांचे विद्यार्थी तिथे वर्षातून ३ वेळा शिबिरां...

बाकरवडी ते बरीटो - भाग ४: दिल तो बच्चा है जी

आपल्याला कोलंबिया विद्यापीठाच्या टीचर्स कॉलेजमध्ये खरंच प्रवेश मिळाळा आहे याची पूर्ण खात्री झाल्यावर आणि त्याने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारीला मी माझ्या PhD चे मार्गदर्शक प्रा. बोर्लंड यांना पत्र लिहिलं. प्रज्ञावंतांच्या शिक्षणातील ते एक अतिशय विद्वान आणि जगप्रसिद्ध प्राध्यापक आहेत. गेल्या काही महिन्यांत आमच्यात जो पत्रव्यवहार झाला होता त्यातील त्यांच्या सूचनेवरूनच मी इकडे अर्ज पाठवण्याचं धाडस केलं होतं. "आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आता शिष्यवृत्तीच्या पत्राची प्रतीक्षा आहे.", मी त्यांना कळवले. PhD च्या शिक्षणासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती मिळतेच या विश्वासाने मी पुढच्या नियोजनाला लागलो. आठवडाभरात विद्यापीठाचा निर्णय येईल याची खात्री होती म्हणून १५ मार्च उजाडला तरी अजून काहीच निर्णय न आल्याने मी थोडा अस्वस्थ व्हायला लागलो होतो. पुढच्या नियोजनाच्या अंतर्गत विनयने, खूप वर्षं बारगळलेल्या आमच्या एका रोडट्रीपची आठवण करून दिली आणि आम्ही, म्हणजे मी, बंड्या आणि विनयने 'आता कमी दिवस उरलेत बाबा' या अविर्भावा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ३: 120th Street, New York

नोव्हेंबर महिन्यातली अर्जांची धावपळ एक डिसेंबरच्या रात्री थंडावली. Harvard, Berkeley, Stanford, Michigan, Wisconsin, आणि Vanderbilt अशा शिक्षण विषयातल्या सहा जगप्रसिद्ध आणि पहिल्या २० च्या यादीतल्या विद्यापीठांचे अर्ज भरून पाठवताना भरपूर दमछाक झाली. शेवटचे २-३ दिवस कामावरून सुट्टी घ्यावी लागलीच. अजून तीन ठिकाणचे अर्ज बाकी होते. त्यांच्या अंतिम तारखा १५ डिसेम्बर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारी असल्याने मी पुन्हा निवांत झालो. शेवटच्या दिवशीपेक्षा अलीकडेच काम संपवले तर आपल्याकडून फाउल होईल आणि धारिणीला धूळ खात पडलेली अभियांत्रिकीची पदवी झोपेत येऊन आपल्याला शाप देईल या भीतीने ते तीनही अर्ज मी शेवटच्याच दिवशी भरले. उगीच रिस्क कशाला?! मी एकूण ९ अर्ज पाठवले. (म्हणजे लाखभर रुपयांचा चुराडा... जास्तच...असो) पैकी ७ ठिकाणी गणित शिक्षण या विषयात तर बाकी दोन ठिकाणी प्रज्ञावंतांचे शिक्षण या विषयात अर्ज केले. अजूनही PhD साठी शिकायला परदेशात जाण्याची मानसिक तयारी झालेलीच नव्हती. पुण्यात माझं निवांत चालू होतं. घरी राहायचं, हातात जेवणाचे आयते ५-६ डबे, कार्यालय मोजून ७ मिनिटांच्या अंतरावर, सगळे सहकारी वर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १: माझे जीआरीपुराण

गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला बाप्पाचं विसर्जन झालं. अंगात जितकी ताकद होती तितकी सगळी लावून रात्रीची मिरवणूक वाजवली. बहुतेक हीच आपली पुण्यातली शेवटची मिरवणूक ठरणार अशी शंका मनात होती. त्यामुळे सुरुवातीलाच कमरेला बांधलेला ताशा शेवटपर्यंत काही मी सोडला नाही. वाद्यांची आवराआवर संपवून घरी येऊन झोपलो ते थेट दुसऱ्या रात्री जेवायलाच उठलो. PhD ला कुठेतरी भारताबाहेर प्रवेश घेण्याचा विचार त्याआधी वर्षभर मनात रेंगाळत होता पण त्यासाठी लागणारी तयारी करायला मुहूर्त लागत नव्हता. बाप्पाचं विसर्जन झालं की तयारी सुरु करायची असं काहीसं ठरवलेलं. तर, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री GRE च्या परीक्षेची माहिती वाचायला घेतली. ETS ची वेबसाईट, काही ब्लॉग्स वगैरे वाचून काढले. काय काय तयारी करायला लागते हे नोंदवायला घेतलं. दुसऱ्या बाजूला हार्वर्ड, कोलंबिया वगैरे विद्यापीठांच्या संकेतस्थळांवर जाऊन माहिती वाचायला घेतली. उगाचच मोठालं अवाढव्य स्वप्नरंजन सुरु झालं.  आणि काही क्षणांमध्येच भानावर आलो - GRE ची तारीख! २ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशला जायचं नियोजन आधीच ठरलेलं आणि ते रद्द करण्याचा व्याभिचारी विचार मनाला शिवणं शक्यच...