Skip to main content

Posts

Showing posts with the label Exploration

पन्नाच्या पानांमधून - भाग २: जंगल वाचताना

 Welcome, Sir! हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं.  पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢 आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत, बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ...

पन्नाच्या पानांमधून - भाग १: वरद, मला जंगल दाखव ना

वरद, मला जंगल दाखव ना… डिसेंबरच्या सुरुवातीला मी वरदकडे जंगल बघण्याची इच्छा बोलून दाखवली. वरद माझ्याहून ८-९ वर्षं लहान पण माझा जुना मित्र. अत्यंत हुशार आणि स्वतंत्र विचारांचा! शाळेपासूनच त्याने छायाचित्रकला शिकली; जंगलं भटकायला सुरूवात केली. आता जैवविविधता विषयात मास्टर्स करता करता Footloose Journeys सोबत naturalist म्हणून काम करतो. तातडीनं त्यानं तारखा काढल्या; वेळापत्रक बसवलं; आणि आमचा "जंगल बघायला जाण्याचा" पहिलाच धाडसी "पारिवारिक" कार्यक्रम सुरू झाला!   पुणे-मुंबई प्रवासात कुठेतरी… आपण पन्नाला जाऊया, वरदने सुचवलं. पन्ना म्हणजे मध्य प्रदेश मधलं एक अत्यंत सुंदर जंगल. झाशी पासून ४ तासांवर आणि खजुराहोच्या मंदिरांपासून अगदी वीस किलोमीटरवर. विंध्य पर्वतरांगांमध्ये कर्णावती नदीच्या काठाने वसलेलं साधारण १००० वर्ग किलोमीटरचं समृद्ध जंगल! समृद्ध अशासाठी की नदी, डोंगर, आणि पठार अशा तिन्ही प्रकारच्या landscape ने नटलेला भूप्रदेश फार थोडक्या जंगलांना लाभला आहे; पन्ना त्यापैकीच एक.  तेवीस डिसेंबरला पुणं सोडलं. अनेकच वर्षांनी घरच्यांसोबत रेल्वेचा प्रवास करताना मुंबईत वडापाव खा...

बाकरवडी ते बरीटो - भाग ८: भागलपूरचा भामटा

आमचं गंगास्वप्न पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बंगालमधून पुण्याकडे परतणारे गट कायम रात्री १० वाजताची आझाद हिंद एक्स्प्रेस पकडून रायपूर-नागपूरमार्गे पुण्याला पोचतात. परंतु आम्हाला काहीतरी वेगळा अनुभव घेण्याची खुमखुमी असल्याने (अंगातले कीडेच म्हणू शकता) आम्ही फरक्काला गाडी पकडून बिहार, उत्तर प्रदेश मार्गे मुंबई गाठायची असं ठरवलं होतं. जेवण उरकून रेल्वे स्थानकाकडे निघणार तेव्हाच गाडी १२ तास उशिरा येणार असल्याचं समजलं. म्हणजे आता संपूर्ण रात्र त्या निर्मनुष्य स्थानकावर काढायची किंवा मालदाकडे उलट जाऊन तिथे वाट पहात बसायचं असे दोन पर्याय समोर होते. रात्री बाराच्या आसपास आम्ही पुढच्या गाडीत जनरलच्या डब्यात चढलो आणि मालदा स्थानक गाठलं. प्रतीक्षाकक्षात वेळ काढत रात्र कशीबशी पुढे सरकली. दर काही तासांनी गाडीची चौकशी करून यायचं, 'कुछ पता नही' हेच उत्तर पुन्हा ऐकायचं, आणि कधीही आपली गाडी येईल आणि आपल्याला न घेताच निघून जाईल अशा अनावश्यक भीतीने अस्वस्थ व्हायचं हे चक्र चालूच होतं. मरणप्राय कंटाळा! अखेर दुपारी कधीतरी गाडी आली आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. वाट बघून दमलेल...

बाकरवडी ते बरीटो - भाग ६: भारतातील शेवटचे गाव

बाकरवडी ते बरीटो लेखमाला लिहायला घेताना केवळ आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रामाणिक हेतू मनात होता. भारतातील सर्वकाही तात्पुरता मागे सोडून पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला येण्याचा हा प्रवास आपल्या सर्वांशी संवादाच्या माध्यमातून वाटून घेताना खूप मजा आली. लिहिता लिहिता स्वतःचा प्रवास पुन्हा जवळून बघायला मिळाला. त्या सर्व कटू-गोड आठवणी आपल्या सर्वांसोबत वाटून घेताना आपल्या अनेक बोलक्या प्रतिक्रिया आल्या. त्यातूनच लिहिण्याची उमेद वाढली. आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभारी आहे. हा भाग ७० दिवसांच्या खंडानंतर लिहितोय. त्याबद्दल प्रथम माफी मागतो. जीआरईची परीक्षा आणि अर्जांची प्रक्रिया संपली. ७ नकार आणि २ होकार असे गणित समोर ठेवून मनाचा गुंता सोडवताना जरा दमछाक झाली. पर्ड्यू आणि कोलंबिया द्वंद्वाचा निकाल लावून पुण्यातला गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान अरुणाचल प्रदेशचा एक दौरा झाला. तिथल्या विद्यार्थ्यांचा निरोप घेताना झालेली घालमेल आणि ब्रह्मपुत्रेचा परत फिरण्याचा आदेश घेऊन पुण्यात परतलो. अरुणाचल हा मनातला एक हळवा कोपरा परंतु त्याहूनही खोलवर रुजलेला आणि गेल्या २० वर्षा...

डोंगर असाही डोंगर तसाही

छायाचित्र सौजन्य : अनुप इताले डोंगर.. उंच डोंगर ढगाळ डोंगर पाणीदार डोंगर हिरवागार डोंगर.. धुकट डोंगर गारगार डोंगर शांत डोंगर सात्विक डोंगर.. आदिवासी डोंगर भाबडा डोंगर प्रेमळ डोंगर निखळ डोंगर.. तोच डोंगर.. कठोर डोंगर रौद्र डोंगर भयाण डोंगर.. दुर्लक्षित डोंगर उपेक्षित डोंगर अविकसित डोंगर नकोसा डोंगर.. दुष्ट डोंगर क्रूर डोंगर निर्दयी डोंगर नको रे डोंगर..  बब्बू 7 जून 18 नागालँड-मणिपूर अभ्यास दौरा

उच्छल जलधि तरंग...

भा रत के सुदूर दक्षिण में विराजित कन्याकुमारी में समुद्र के भीतर एक शिला पर स्वामी विवेकानंद का स्मारक बना है| स्वामीजी ने अपने भारतभ्रमण के दौरान इस शिला पर तीन दिन चिंतन किया था| आज उसी शिला पर बैठ मैं प्रकृति के उस अद्भुत कलाकृति को देख रहा था जहाँ तीन समुद्र एक दुसरें से मिलते है| कहने को तो 'हम' कहते है कि ‘तीन समुद्रों’ का मिलाप हो रहा है| लेकिन फिर सोचा - अरे, समुंदर तो एक ही है| हम इंसानों ने उसे तीन अलग अलग नाम दे कर बाँट दिया| और, फिर अब 'हम' ही कह रहे है कि वे मिल रहें हैं| चलो, कोई बात नही| तीन तो तीन ही सही| लेकिन हाँ, हर भारतीय ने इस शिलास्मारक को जरूर देखना चाहिये इसमें कोई दो (या ‘तीन’) राय नहीं| J सच कहूँ तो, देखना नहीं 'महसूस' करना चाहिये| क्यूंकि, विवेकानंद शिला स्मारक कोई ‘टूरिस्ट स्पॉट’ नहीं है| वह तो एक स्फूर्तिस्थान है| पर्यटक के वेश में जाओगे तो शायद सिर्फ ‘तीन समंदर’ देख पाओगे| समुद्र के भीतर विवेकानंद शिलास्मारक और तमिल संत तिरुवल्लुवर की प्रतिमा कन्याकुमारी से निकल कर मैं और अंकित केरल की राजधानी तिरुवनंतपुरम की तरफ चल पड़े...

आज मैं “लिखने” जा रहा हूँ...

क ई महीनों से सोच रहा था कि मन में आनेवाले विचारों को कागज़ पे उतारूँ| लेकिन कभी समय का कारण देता रहा, तो कभी शब्दों की नि:शब्दता का| सच कहूँ तो, आलस्य ही इसका कारण है जो हमेशा मुझे 'कारण' देने के लिए प्रवृत्त करता रहा| लेकिन आज विजयादशमी (दशहरा) का दिवस है, सीमोल्लंघन का दिवस है| इसलिए मैंने भी सोचा कि आज खुद ही के आलस पर विजय प्राप्त करने हेतु शुरुआत करूँ| तो आइये मै पहल कर रहा हूँ| ये मेरा पहला ब्लॉग है| लेकिन क्या  शुरुआत  करना भी इतना आसान था? बिलकुल नहीं| लिखूँ तो क्या लिखूँ? कौनसी बोली में लिखूँ? ऐसे कई द्वंद  मन में उठे| प्रात: १ बजे से बस में बैठे बहुत सोचा| कई सारे विषय मन में उठ रहे थे| लेकिन बड़ा सवाल तो बोली का था| “भाई, कौनसी भाषा में लिखूँ?” – मैंने मन से पूंछा| वैसे ३ ही तो पर्याय थे – मराठी, अंग्रेजी और हिंदी| हिंदी और अंग्रेजी में लिखना एक चुनौती थी| मराठी में लिखूंगा तो लिखने में आसानी तो होगी| लेकिन क्या मेरे सारे मित्र पढ़ पाएँगे? “क्या रे, तू लिख किसके लिए रहा है? खुद के लिए कि दूसरों के लिए?” - मेरे मन ने प्रतिसवाल किया| ...