Skip to main content

Posts

जखमी वाघाची गर्जना

चेंडू गणिक खोलीतलं वातावरण तंग होत चाललं होतं. 160 च्या आव्हानासमोर भारताचे 5 गडी स्वस्तात तंबूत परतले होते. कोहली आणि पांड्या तेव्हढे टिकून उभे होते. 8 चेंडूत 28 धावा हव्या होत्या. "अगली दो गेंदों पे दो छक्के लग जाये तो फिरभी कितने रन्स बनाने होंगे इनको," अहमद मजेत म्हणला. "सोलह," मी पटकन म्हणलं. "मनहूस, तू पीटने वाले काम मत कर," आमेर त्याला म्हणला. मी खुर्चीत नर्वस बसलो होतो.  चार पाकिस्तानी मित्रांसोबत मी भारत-पाकिस्तान सामना बघत होतो. बे एरियातल्या सनीवेलमध्ये माझी पाकिस्तानी मैत्रीण हुमाकडे मी वीकएंडसाठी आलो होतो. तेव्हा मला भारत-पाकिस्तान T20 विश्वचषकाचा सामना आहे हेही माहीत नव्हतं. सचिन-गांगुली-द्रविड नंतर क्रिकेट बघण्यात फारसा रस उरला नव्हता. हुमाचा नवरा सकाळी म्हणला, "मेरे कुछ दोस्त मॅच देखने मिलने वाले है| आप चलेंगे?" विचार केला च्यायला अशी संधी कधी मिळायची परत. आधीच भारत-पाकिस्तान सामना, त्यात विश्वचषक स्पर्धा, आणि त्यावर कहर म्हणजे एकट्याने पाकिस्तानी चाहत्यांसोबत बसून सामना बघायचा.  "कितने बजे शुरू होना है मॅच," मी विचारलं....
Recent posts

पन्नाच्या पानांमधून - भाग २: जंगल वाचताना

 Welcome, Sir! हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं.  पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢 आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत, बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ...

पन्नाच्या पानांमधून - भाग १: वरद, मला जंगल दाखव ना

वरद, मला जंगल दाखव ना… डिसेंबरच्या सुरुवातीला मी वरदकडे जंगल बघण्याची इच्छा बोलून दाखवली. वरद माझ्याहून ८-९ वर्षं लहान पण माझा जुना मित्र. अत्यंत हुशार आणि स्वतंत्र विचारांचा! शाळेपासूनच त्याने छायाचित्रकला शिकली; जंगलं भटकायला सुरूवात केली. आता जैवविविधता विषयात मास्टर्स करता करता Footloose Journeys सोबत naturalist म्हणून काम करतो. तातडीनं त्यानं तारखा काढल्या; वेळापत्रक बसवलं; आणि आमचा "जंगल बघायला जाण्याचा" पहिलाच धाडसी "पारिवारिक" कार्यक्रम सुरू झाला!   पुणे-मुंबई प्रवासात कुठेतरी… आपण पन्नाला जाऊया, वरदने सुचवलं. पन्ना म्हणजे मध्य प्रदेश मधलं एक अत्यंत सुंदर जंगल. झाशी पासून ४ तासांवर आणि खजुराहोच्या मंदिरांपासून अगदी वीस किलोमीटरवर. विंध्य पर्वतरांगांमध्ये कर्णावती नदीच्या काठाने वसलेलं साधारण १००० वर्ग किलोमीटरचं समृद्ध जंगल! समृद्ध अशासाठी की नदी, डोंगर, आणि पठार अशा तिन्ही प्रकारच्या landscape ने नटलेला भूप्रदेश फार थोडक्या जंगलांना लाभला आहे; पन्ना त्यापैकीच एक.  तेवीस डिसेंबरला पुणं सोडलं. अनेकच वर्षांनी घरच्यांसोबत रेल्वेचा प्रवास करताना मुंबईत वडापाव खा...

संवाद तरुणाईशी: रामन को मन की शक्ति देना

रात्रीचे साडे दहा वाजले असतील. अमेरिकन निवडणुकीचे निकाल बघायला टीव्ही समोर बसणार इतक्यात फोन वाजला. "हां बोल रे, रामन," मी नेहमीच्या उत्साहात सुरूवात केली. समोरून काहीच उत्तर आलं नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचकली. काहीतरी गडबड झाली आहे याचा अंदाज आला. रामन 24-25 वर्षांचा अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू विद्यार्थी. ऐन कोरोनाच्या साथीत शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधायचे त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते पण यश येईना. "काय झालं?" मी काळजीने विचारलं. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला जड जात होतं. मला फक्त त्याचा हुंदका ऐकू आला.  "आय अॅम सॉरी," म्हणत रडू आवरायचा त्याने प्रयत्न केला, पण त्याला ते सगळं असह्य झालं होतं. तो मनमोकळेपणाने रडला. काही मिनिटं अशीच स्तब्ध गेली. हळूहळू तो बोलता झाला. गेले अनेक महीने घरी बसून असल्याने त्याचं दडपण रोज वाढत होतं. स्वतःच्या क्षमतांबद्दलचे प्रश्न मनात काहूर करत होते. त्यातच एका मैत्रिणीशी आज फोनवर बोलताना ती म्हणली, "अरे, इतर कितीतरी कमी deserving लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. तुला...

संवाद तरुणाईशी: आई-बाबा मला त्रास होतोय

आज एका पालकांशी त्यांच्या तरुण मुलाच्या मानसिक स्वास्थ्य विषयावर बोलण्याचा योग आला. गेली चार वर्षे कमी अधिक फरकाने मुलाचे मानसिक स्वास्थ्य अधून मधून बिघडताना जाणवत होते. एकटेपणा वाटणे, समोर उद्दिष्ट न दिसणे, कंटाळवाणे वाटणे, कशातही आनंदी न वाटणे, या विचारांनी डोकं बधिर होणे, उदास वाटणे, या सगळ्याबद्दल स्वतःला अपराधी मानणे अशा तक्रारी तो मला अधून मधून सांगत असे. या सगळ्यात पॅटर्न दिसायला लागल्यावर मी त्याला समुपदेशिकेकडेही जायला सांगितले. पण तेही त्याने नंतर बंद केले. गेल्या काही दिवसात त्रास वाढायला लागल्यावर मात्र त्याने घरी सांगितले पाहिजे याबद्दल मी आग्रह धरला. "घरचे काय म्हणतील", "ते काय मदत करू शकतील", "उलट मलाच दोष देतील" या विचारांनी तो घरी सांगायला तयार होईना. "तुझे पालक आहेत ते; समजावून सांगितलं तर नक्की समजावून घेतील; त्यांना संधी तर दे," असं सांगून त्याला तयार केलं. पण बोलायचं कसं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. प्रत्यक्ष बोलणं जड जाणार असेल तर कोणाच्या तरी माध्यमातून बोल किंवा पत्र लिही असं सुचवलं. त्यानुसार त्याने एक whatsapp संदेश तयार...

ज्ञा पु, ही चिटिंग आहे..

प्रिय ज्ञा पु, सप्रेम नमस्कार! आज तुम्हाला हे पत्र लिहिताना मनात खूप अस्वस्थता आहे. वेळ जणू काही मंदावला आहे. आज दिवसभर सतत मनात तुमच्या आठवणींनी काहूर माजलं होतं. आजवर तुमच्याशी बोलताना कधीच संकोच वाटला नाही, पण आज हे पत्र लिहिताना मात्र शब्द अडकतायेत. मागच्या महिन्यात आपण तुमच्या वाढदिवसाला बोललो. किती उत्स्फूर्तपणे तुम्ही "धन्यवाद बंधू आकाश" अशी साद घातली होतीत. कसं जमायचं तुम्हाला असं कोणालाही आपलंसं करून टाकायला? मेच्या शेवटच्या आठवड्यात तर आपण शिबिराला भेटलो. एका मेसेजवर तुम्ही शिबिरात विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला तयार झालात. स्व-रूपवर्धिनी सारख्या मोठ्या संस्थेचे कार्यवाह असूनही तुम्ही एका मेसेजवर "हो" म्हणलात. तुम्हाला एका साध्या फोनचीही अपेक्षा नाही वाटली? कुठून येतो हा साधेपणा? कसं जमतं अशा सर्व जगाला व्यापून उरलेल्या अहंचा त्याग करणं? तुमचा प्रतिसादही मला लाजवणारा होता. तुम्ही उत्तरात लिहिलंत, "अरे जरूर आकाश. आप सिर्फ आज्ञा करो. बंदा हाजीर. 😄" अहो ज्ञा पु, कोण असं इतकं स्वतःवर हक्क गाजवून घेतं? मी तुमच्याहून २० वर्षांनी लहान. तुमच्या कार्य कर्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १०: बरीटोशी गट्टी

ठाण्याच्या अलीकडे गाड्यांची ही प्रचंड गर्दी. विमानतळावर जाण्यापूर्वी ठाण्याच्या मामाला भेटायचं आणि मग रवाना व्हायचं, असं ठरलं होतं. पण ही गर्दी बघता विमान चुकतंय का काय अशी भीती वाटायला लागली होती. त्यातच शेजारच्या धसमुसळ्या चालकाने आमची गाडी घासली आणि आरश्याचा चुराडा झाला. गाडीतला ताण हळूहळू वाढत चालला होता...अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती...त्यातही वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचे प्रयत्न आईकडून चालूच होते! ठाण्याला पोचलो तेव्हा घराच्या बाहेरच पवईचा अनुप भेटला. अनेक तास वाट बघून कंटाळला होता बिचारा. खरगपूरहून रत्नदीप येऊ शकणार नव्हता. अनुप, रत्नदीप, सौरभ, पुष्कर म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षातले सर्वात जवळचे साथीदार. त्यांनी मिळून एक भेटवस्तू आणली होती. ती देण्यासाठी रात्रीच्या अपप्रहारी अनुप ठाण्याच्या अनोळखी गल्लीत वाट बघत उभा होता. मामाचा निरोप घेऊन विमानतळावर पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा तो रुबाबच अजब! अनेक मित्रांनी माझ्याआधी यापूर्वी तिथून जड निरोप घेतला होता. त्या सर्वांच्या मनात भावनांची काय गर्दी त्या क्षणी झाली असेल याचा अनुभव मी घेत होतो. भव्य कमानींच्या प्रवे...