Skip to main content

पन्नाच्या पानांमधून - भाग २: जंगल वाचताना

 Welcome, Sir!

हसऱ्या चेहऱ्यानं आमचं राणीपूर गावात स्वागत झालं. दुपारचे चार वाजले होते. आमच्या गाडीची वाट पहाट ६ स्थानिक तरुण-तरुणी रस्त्याच्या कडेला उभे होते. जंगल सफारी तर पुढच्या दिवशीपासून सुरू होणार होती. मग इथं नेमकं काय बघायला आलोय याची उत्सुकता लागली होती. "Walk with the Pardhis" अशा नावाचा कार्यक्रम इथे होणार होता इतकंच माहीत होतं. 

पारधी समाज हा पारंपारिक दृष्ट्या शिकारीवर अवलंबून असलेला भटका समाज. इतर समाजाने काहीसा वाळीत टाकलेला, गुन्हेगार ठरवून टाकलेला समाज. गावात कोणताही गुन्हा घडला की पहिले पारधी वस्तीवर अटक होणार हे आपल्या समाजातलं करूण वास्तव. "ज्याच्या हाती ससा तो पारधी" अशी म्हणच जिथे रुळली आहे तिथे पारध्याच्या नशिबी "आधी अटक मग चौकशी" हाच न्याय येणार. त्यात नवल ते काय! 😢

आपण आता जंगल कसं बघायचं हे शिकणार आहोत,

बीरेन दादाने सांगितलं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरूवात केली. "हे आवळ्याचं झाड," "हे खैराचं झाड. पानात कथ्था लावतात ना ते हेच," असं सांगत सांगत त्यांनी आम्हाला एका खड्ड्यापाशी थांबवलं. "हे बघा, हे ओरखडे बघताय? हे अस्वलाने केलेत. वाळवी खाण्यासाठी अस्वलं जमिनीत असे खड्डे करतात." आम्ही थबकून सगळं ऐकत होतो.

हा ठसा बघा. तरस या बाजूने तिकडे गेलं आहे.

"हा छोटा ठसा रानडुकराचा आहे. हा वाघालाही टशन देतो." "ही विष्ठा बघताय? ही नीलगायीची आहे. नीलगायी एका ठराविक ठिकाणी कायम विष्ठा करतात. मग वाळवी त्याचं मातीत रूपांतर करते." आम्ही कुतूहलाने सगळं समजावून घेत होतो. पुढे आम्ही असेच लंगूर, मुंगूस, उदमांजर (Civet) यांचे ठसे बघितले. ठसे बघून ते कोणत्या प्राण्याचे आहेत हे ओळखण्यात आता आम्हाला मजा येऊ लागली होती.

पाऊलखुणा वाचायला शिकताना 
हे ठसे बघताय? हा बिबट्याचा ताजा ठसा. आज पहाटेच बिबट्या इथून गेलाय. 

१२ सेंटीमीटरचा तो पंजा बघून आम्ही मोठा आवंढा गिळला. काही तासांपूर्वी याच वाटेवरून बिबट्या गेलाय ही कल्पना शहारा आणणारी होती, तेही वस्तीपासून अवघ्या काही मीटरवरून! 

बिबट्याचा ठसा

सूर्य मावळतीस जात होता. आता आमची पायवाट एका कड्याशी येऊन संपली. समोरच्या काळ्या कातळावर पोचलो आणि भानच हरपले! १००-२०० फुटांच्या sandstone च्या उत्तुंग घळीवर आम्ही उभे होतो. नजर जाईल तिथवर डोंगर रांगा आणि घनदाट जंगल. समोरच्या कड्यावर दिसत होत्या असंख्य कपारी आणि कड्याच्या तळाशी नीळाशार पाणवठा! नि:शब्द शांततेला अपवाद फक्त कड्यावरच्या वाऱ्याचा. शब्दांच्या पलीकडचं असं काहीतरी आम्ही अनुभवत होतो! 

The Gorgeous Gorge of Ranipur!

बीरेन दादांनी आम्हाला विविध पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज काढून दाखवले. बिबट्याचा आवाज तर इतका हुबेहूब काढला की शेजारीच उभं असलेलं कुत्रं घाबरून भुंकायला लागलं.

अंधार व्हायला लागला तशी उत्सुकतेची जागा आता अनिश्चिततेने आणि भयाने घ्यायला सुरूवात केली. आम्ही परतीची पायपीट सुरू केली. बांधावर एका आज्जींनी पकोडा तळला. दगडावर आवळे ठेचून त्याची अप्रतिम चटणी केली. पळसाच्या पानांच्या द्रोणातली ती भजी-चटणी खाताना आमच्यात संवाद रंगला. 

पळसाच्या द्रोणात पकोडा आणि आवळ्याची चटणी 

आम्ही आधी शिकार करायचो. आता आम्ही शिकार सोडली आहे. 

पारधी बांधवांनी त्यांच्या नवीन जीवनशैलीबद्दल सांगायला सुरूवात केली. "आम्ही जंगलाच्या जवळ रहात होतो. काही वस्तू खरेदी करायला बाजारात यायचं म्हणजे अधिकाऱ्यांची नजर चुकवायला लागायची. मग त्यासाठी इतरांसारखे कपडे घालायचो. प्राण्यांच्या आवाजात एकमेकांशी बोलायचो. हळूच परत जंगलात यायचो. अंग चोरून राहायचो. आता आम्ही भटकत नाही. एका ठिकाणी वस्ती करतो. मुलांना शाळेत घालतो. आम्ही शिकार सोडली आहे. आता जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करतो." 

स्थानिक सेंद्रिय मध खरेदी करताना

खरंय! अवघ्या १२ वर्षांपूर्वी पन्नातले वाघ नष्ट झाले होते. काही शिकारीने गेले तर काही नर माद्या संपल्याने निघून गेले. मग वन खात्याने अथक प्रयत्न करून नवीन वाघ आणले. ते टिकण्यासाठी इतर जैवव्यवस्था वाढवली. स्थानिक बांधवांची मदत घेतली. त्यात पारधी समाजाचे मोठे योगदान आहे. परिणामतः, पन्नात आता साठ-सत्तर वाघ, दोनशेच्या आसपास बिबट्या, आणि प्राणी-पक्षांच्या शेकडो प्रजाती आहेत. 

वाघ-बिबट्या अन्न साखळीच्या सर्वात वर आहेत. ते टिकले तर जंगल टिकेल, माणूस टिकेल, हा विचार मनात घेऊन आम्ही राणीपूर सोडले. उद्या जंगलात जाण्यापूर्वी आम्ही आज जंगल कसे वाचायचे हे शिकण्यास सुरूवात केली. आता ओढ लागली ती वाघाच्या प्रत्यक्ष भेटीची! (क्रमश:)

चलचित्रण

बब्बू

३० डिसेंबर २०२१

छायाचित्रं - अंतरा चौकसे, वरद बनसोड

भाग १

Comments

Popular posts from this blog

Is it all about sex?

Shocked by the title? Or maybe excited? Maybe you are thinking that I have gone crazy to talk about 'this' thing. Maybe, you will be disappointed with what I am going to write. In any case, since you are already here, do read till the end. Read because this is a true story about someone's private life and not-so-private life. In October 2014, I met a person with a beautiful voice. She sang a melodious Kannada bhajan. I and my friends sat around her to listen to her story, a story that was unheard of, a story which was not even close to our realities. She narrated 'her' story..a story of a transgender! Akkai is her name today but she was born as Jagadish. ...I was born as a male child, a child with male private parts. Born into an upper caste family and father serving in the Air Force, it was herculean to come out to them. My brother had married a Christian girl and was excommunicated. Then sister married a Dalit boy and was excommunicated too. At the tender ag...

दुसरीच्या गणिताचं कोडं

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) संख्या वाचन आणि लेखनाची नवीन पद्धत आणली आहे. त्यावर सामाजिक माध्यमातून बरीच चर्चा झाली हे चांगलं झालं. या निमित्ताने शिक्षणासारखा महत्वाचा विषय चर्चेत आला. याबद्दल थोडक्यात... १. एकवीस , बावीस..च्या जोडीने वीस एक , वीस दोन ही पद्धत पुस्तकात आणली आहे. ही निश्चितच तुलनेने सोपी आहे याची कारणे शिक्षणशास्त्राच्या नजरेतून पुढीलप्रमाणे -   १.१ ' दशक आणि एकक पद्धतीमध्ये १० एकक एकत्र करून दशक होतो आणि त्यात पुढे एकक जोडत गेले की मोठ्या संख्या तयार होतात ' ही मांडणी प्राथमिक इयत्तांमधली पुस्तकांमध्ये मांडली जाते. यातील दशक-एकक क्रम महत्वाचा आहे. Concrete to abstract या pedagogical तत्त्वाला अनुसरून दहा एककांची मोळी तयार करणे अशा क्रियांना महत्व दिले गेले आहे. हा बदल 2005 च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणापासून जास्त स्पष्टपणे मांडला आहे. संख्या वाचनाचा नवीन बदल हा त्याच धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. म्हणून हा बदल गणित अध्यापनाच्या दृष्टीने शास्त्रीय ठरतो .  १.२ 'दशकाकडून एककाकडे'  हा  क्रम...

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...