Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

बाकरवडी ते बरीटो - भाग २: कोणी प्रवेश देईल का, प्रवेश?

जीआरीच्या अटकेतून पसार होऊन मी अरुणाचल गाठले. धावपळीने ग्रासलेल्या शहरी जीवनाशी फारसा संबंध न ठेवणाऱ्या डोंगराळ अरुणाचलात इतकी शांतता लाभण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या मोबाईलला नसलेली रेंज. बोंबलायला पुण्यातून एकही फोन नाही ओ! पहाटे पाचलाच उजाडणार. पण आपण सातला उठायचं, उपासना करायची, नाश्ता हाणला की थेट शिबिरात. संध्याकाळी मैदान, दल वगैरे संपवून रात्रीचं जेवण करून, पोरांशी गप्पा मारून थेट दहा वाजताच खोलीवर परत यायचं. त्यानंतर वीज पुरवठा बंद होणार. मेणबत्तीच्या प्रकाशात पुढच्या दिवशीचे नियोजन करेपर्यंत १२ वाजणार. मग कीर्र अंधारात उभ्या असलेल्या आपल्या खोलीबाहेर मस्त खुर्ची टाकून मोबाईलवर धृपद लावायचे आणि समोरच्या झाडीतल्या रातकिड्यांच्या साथीने त्या अभंग समाधीचा अद्भुत अनुभव घ्यायचा..आत्मिक सुख..दुसरं काय! अरुणाचलहून पुरेशी आत्मिक विश्रांती घेऊन परत आल्यावर सुरु झाली विद्यापीठांना अर्ज करण्याची लगबग. बहुतेक ठिकाणी एक डिसेम्बरच्या आतच अर्ज करायचे होते. त्यासाठी रोज विद्यापीठांची माहिती वाचा, त्यातले आपले आवडते विभाग शोधा, त्या ठिकाणी काम करणारे प्राध्यापक शोधा, त्या ५०-६० प्राध्...

बाकरवडी ते बरीटो - भाग १: माझे जीआरीपुराण

गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला बाप्पाचं विसर्जन झालं. अंगात जितकी ताकद होती तितकी सगळी लावून रात्रीची मिरवणूक वाजवली. बहुतेक हीच आपली पुण्यातली शेवटची मिरवणूक ठरणार अशी शंका मनात होती. त्यामुळे सुरुवातीलाच कमरेला बांधलेला ताशा शेवटपर्यंत काही मी सोडला नाही. वाद्यांची आवराआवर संपवून घरी येऊन झोपलो ते थेट दुसऱ्या रात्री जेवायलाच उठलो. PhD ला कुठेतरी भारताबाहेर प्रवेश घेण्याचा विचार त्याआधी वर्षभर मनात रेंगाळत होता पण त्यासाठी लागणारी तयारी करायला मुहूर्त लागत नव्हता. बाप्पाचं विसर्जन झालं की तयारी सुरु करायची असं काहीसं ठरवलेलं. तर, ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री GRE च्या परीक्षेची माहिती वाचायला घेतली. ETS ची वेबसाईट, काही ब्लॉग्स वगैरे वाचून काढले. काय काय तयारी करायला लागते हे नोंदवायला घेतलं. दुसऱ्या बाजूला हार्वर्ड, कोलंबिया वगैरे विद्यापीठांच्या संकेतस्थळांवर जाऊन माहिती वाचायला घेतली. उगाचच मोठालं अवाढव्य स्वप्नरंजन सुरु झालं.  आणि काही क्षणांमध्येच भानावर आलो - GRE ची तारीख! २ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशला जायचं नियोजन आधीच ठरलेलं आणि ते रद्द करण्याचा व्याभिचारी विचार मनाला शिवणं शक्यच...